रक्षाबंधन दिवशी बहिणींनी ओवाळले अन् भावाने ओवाळणीत दिले आपले प्राण

औरंगाबाद | रक्षाबंधनच्या दिवशीच औरंगाबादमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. बहिनींकडून राखी बांधून झाल्यानंतर एका अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रुपेश दगेंद्र बिऱ्हाडे (वय 26) असं मृत युवकाच नाव असून सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ठाकरेनगर परिसरात ही घटना घडली आहे.

रुपेश एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. तो गेल्या चार पाच दिवसांपासून कोणाशीही जास्त बोलत नव्हता. सोमवारी सांयकाळी त्याच्या नात्यातील काही बहिणी त्याला राखी बांधण्यासाठी आल्या होत्या. राखी बांधून झाल्यानंतर साडेनऊच्या सुमारास रुपेश आपल्या रूममध्ये गेला.

रुपेशचे वडील त्याला जेवणासाठी बोलवायला गेले असता रुपेशने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर वडिलांनी रूमचा दरवाजा तोडला तेव्हा त्याने गळफास घेतल्याचं समजलं. रुपेशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वी मृत घोषित केलं.

रुपेशच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मुत्युची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

अमृताजी, पोलीस बांधव तेच आहेत बदललीय ती फक्त तुमची दृष्टी; चाकणकरांचा निशाणा

अमृताजी, पोलीस बांधव तेच आहेत बदललीय ती फक्त तुमची दृष्टी; चाकणकरांचा निशाणा

शिवसेना राम जन्मभूमीत थाटामाटात कार्यक्रम करणार; भूमिपूजनानंतर संजय राऊत गरजले

मावळे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे माध्यम झाले तसे….- नरेंद्र मोदींनी काढली महाराजांची आठवण

“ज्यांच्या रक्तात शिवसेना आणि ज्यांचा प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी होता, तो अखेर काळाने निष्ठुरपणे थांबवला”