मुंबई | काल सुशांतच्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना टोला लगावत भाजपवर निशाणा साधला होता. यावर भाजपकडून पवारांना सणसणीत प्रत्युत्तर आलं आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याप्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत 2014 मध्ये सुरू करण्यात आली आहे. मात्र अद्याप सीबीआय त्यात कुठल्याही ठोस निष्कर्षाप्रत येऊ शकलेली नाही. त्यामुळं या चौकशी प्रक्रियेप्रमाणे सुशांतसिंह प्रकरणाच्या तपासकार्याची परिणती होऊ नये, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. यावर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
ज्यावेळी दाभोळकरांना मारलं तेव्हा राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे सरकार होतं आणि गृहमंत्रीही तुमच्याच पक्षाचा होता. तुमच्या सरकारने तब्बल 14 महिने या प्रकरणाशी निगडीत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही केला, हे विसरू नका, असं म्हणत भातखळकरांनी पवारांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, अतुल भातखळकरांनी दिलेलल्या प्रत्युत्तरावर महाविकास आघाडीकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास #CBI च्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 20, 2020
*दाभोळकरांच्या हत्येवेळीही गृहखाते राष्ट्रवादीकडेच होते : भातखळकर*
सुशांत सिंह राजपूत प्रकरण नरेंद्र दाभोळकरांच्या हत्या प्रकरणासारखे होणार नाही ना, असा खोचक सवाल विचारणाऱ्या शरद पवार यांना अतुल भातखळकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.https://t.co/5hzTiYoQTY
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 20, 2020
महत्वाच्या बातम्या-
मुंबई पोलिसांना न्यायाच्या आणि सत्याच्या मार्गावर असताना रोखलं हे बरोबर नाही- संजय राऊत
काय सांगता…! कांदा एवढा लाभदायी आहे; सविस्तर वाचा
रिया आणि सुशांतच्या नात्याची सुरुवात कशी झाली?; रियाने सांगितली ‘लव्ह स्टोरी’
भाजपचा कॉंग्रेसला मोठा झटका! कॉंग्रेसच्या पाच आमदारांनी हाती घेतला भाजपचा झेंडा