लखनऊ | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात घोषणा देणाऱ्यांना जिवंत गाडू, असं वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशमधील मंत्री रघुराज सिंग यांनी केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
देशात मोदी आणि उत्तर प्रदेशमध्ये योगी राज आहे. त्यामुळे घोषणा देण्याआधी विचार करा. तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. तुम्हाला जामीनही मिळणार नाही. स्वत:चं भविष्य खराब करुन घेऊ नका, असा इशाराही सिंह यांनी दिला आहे.
रघुराज यांनी जवाहरलाल नेहरु विद्यापीठ आणि इतर विद्यापीठांत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना इशारा दिला आहे. मोदी-योगी विरोधातल्या घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत, असं ते म्हणाले आहेत.
मोदी आणि योगीच देश आणि उत्तर प्रदेशचा कारभार पाहतील आणि जसं सध्या सुरु आहे तसंच पुढेही सुरु असेल. मुठभर लोकांच्या घोषणा देण्यानं काहीही होणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकू- अमित शहा – https://t.co/sHGcfV9AOn @AmitShah @BJP4India @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 13, 2020
भाजपवाल्यांनो, जनाची नाही मनाची तरी बाळगा; अभिनेता हेमंत ढोमेला संताप अनावर – https://t.co/8B3nZmoZvH @hemantdhome21 @narendramodi @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 13, 2020
“तुकडे-तुकडे गँगला धडा शिकवा, लष्कराला आदेश द्या” – https://t.co/K06OD1POzu @narendramodi @BJP4India @ShivSena @rautsanjay61
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 13, 2020