केंद्र सरकार आधी मुक होतं आता आंधळंही झालं आहे; राहुल गांधींचं टीकास्त्र

नवी दिल्ली | कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मात्र देशातील तब्बल 6 लाख आशा सेविकांनी आंदोलन पुकारलं आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

देशातील प्रत्येक घरापर्यंत आशा सेविका आरोग्य सुरक्षा पोहोचवतात. खऱ्या अर्थानं त्या आरोग्य योद्धा आहेत, पण आज स्वतःच्या हक्कासाठी संप करण्यासाठी मजबूर झाल्या आहेत. सरकार मुकं तर होतंच, कदाचित आता दृष्टिहीन आणि बहिरंही झालं आहे, असं म्हणत राहुल गांधींनी केंद्र सरकरावरला धारेवर धरलं आहे.

आशा सेवितकांच्या काही मागण्या आहेत. त्यासाठी त्यांनी देशभर आंदोलन पुकारलं आहे. आशा सेविकांना त्याचं वेतन हे वेळेवर मिळावं आणि ते सन्मानजनक असावं त्यासोबतच आशा सेविकांंशी संबंधित काही मागण्या केल्या आहेत.

दरम्यान, कोरोनाचं संक्रमण वाढत असताना लॉकडाऊनमध्ये त्यांनी ग्रामीण भागात शहरातून आलेल्या लोकांच्या आरोग्याबाबतची माहिती त्यांनी आरोग्य विभागाला देण्याचं काम केलं. त्यासोबतच गावातील गर्भवती अवस्थेतील स्त्रियांना गोळ्या औषधे पुरवणे, अशा प्रकाराची महत्वाची काम त्यांनी केली होती.

 

महत्वाच्या मागण्या-

‘या सरकारचं डोकं सरकलंय की काय?’; निलेश राणेंचा ठाकरे सरकारवर घणाघात

पहिल्या नवऱ्याला एक कोटी तर दुसऱ्याला 45 लाखाचा गंडा घातला अन् परदेशात तिसऱ्या सोबतच तिचा संसार थाटला

एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं; साखरझोपेत असताना 3 सख्ख्या भावांचा सापानं केला घात

संतापजनक! निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती; शारीरिक सबंध ठेवायला विरोध केल्याने 12 वर्षीय मुलीच्या गुप्तांगात….

कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने सामूहिक आत्महत्या करणाऱ्या त्या प्रकरणाला आला नविन ट्विस्ट