मुंबई : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने स्वित्झर्लंड येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. तिच्या या कामगिरीसाठी मुंबईमध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मागचं सारं काही विसरून अभिषेक बच्चन आणि विवेक ओबेरॅाय यांची गळाभेट झाली.
अनेक बॉलिवूड कलाकारांनी तेथे हजेरी लावली होती. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन हे मुलगा अभिषेक बच्चनसोबत तेथे उपस्थित होते. तर अभिनेता विवेक ओबेरॉय वडिल सुरेश ओबेरॉय आणि पत्नी प्रियांकासोबत या कार्यक्रमला उपस्थित होता. सुरेश ओबेरॉयने अमिताभ यांना पाहताच मिठी मारली. काही वेळानंतर अभिषेक आणि विवेक एकमेकांसमोर आले आणि त्यांनीदेखील एकमेकांना मिठी मारली
लोकसभा निवडणुकीवेळी विवेक ओबेरॉयनं ऐश्वर्याबद्दलचं एक मीम शेअर केलं होतं. तेव्हा विवेकला ट्वीट डिलीट करुन माफी मागावी लागली होती. या वादग्रस्त पोस्टनंतर अभिषेक आणि विवेक पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले आणि त्यांनी एकमेकांना मिठी मारली.
अभिषेक आणि विवेकमध्ये थेट वाद नसले तरी ऐश्वर्यामुळे त्यांच्यामध्ये वाद असल्याचे म्हटलं जाते. ते दोघेही एकमेकांसमोर येणं टाळतात. ऐश्वर्या आणि सलमानच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या आणि विवेक ओबेरॉय हे रिलेशनशीपमध्ये होते. परंतू त्यांचं रिलेशन फार काळ टिकलं नाही. त्यानंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केले.
दरम्यान, या गळाभेटीनंतर मागच सगळं विसरून या दोघात पुन्हा मैत्री होऊ शकते का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
…तर मी प्रबोधनकारांच्या शिवसेनेला मदत करेन- लक्ष्मण माने- https://t.co/YcmnOMINi1 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 9, 2019
…तर मी माझा पक्ष वंचितमध्ये विलीन करेन- लक्ष्मण मानेhttps://t.co/VhaMUS8x0i
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 9, 2019
आण्णांवर प्रेम करणारी शेवंता त्यांच्यापासून दूर जाणार? – https://t.co/RiTQMtKpeR #marathi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 9, 2019