अभिनेत्री कंगणा राणावतचा बीएमसीवर अत्यंत गंभीर आरोप; म्हणाली, माझ्या शेजाऱ्यांना…

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून आपल्या वा.दग्रस्त विधानांमुळं चांगलीच चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर कंगनानं बॉलिवूड मधील नेपो.टीजम, मुव्ही मा.फिया यांच्यासह काही राजकीय नेत्यांवरही टी.का करत वा.दग्रस्त विधानं केली आहेत. यामुळे अनेकांनी कंगनाविरुद्ध संता.प व्यक्त केला आहे.

कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केली होती. यामुळे अनेक शिवसेना नेत्यांनी कंगना विरुद्ध तोफ डागलली होती. कंगना आणि शिवसेना नेत्यांमध्ये चाललेलं हे शाब्दिक यु.द्ध सर्वांनीच पाहिलं होतं. यानंतर कंगनाचं मुंबईतील ऑफिस बीएमसीच्या जागेत असल्याचं सांगत बीएमसीनं कंगनाच ऑफिस पा.डलं होतं. तसेच मुंबईतील कंगनाच्या बंगल्यावरही कारवाई केली होती.

सोशल मीडियावर बीएमसीच्या या कार.वाईचा मोठ्या प्रमाणात नि.षेध पाहायला मिळाला होता. बीएमसीच्या या कार.वाईमुळे कंगनाला चांगलंच दुःख झालं होतं. कंगनानं बीएमसीवर याविरुद्ध ख.टला दाखल केला आहे. अशातच आता कंगनानं बीएमसीवर आणखी काही गंभीर आ.रोप केले आहेत.

कंगनाच्या म्हणण्यानुसार बीएमसीनं तिच्या शेजाऱ्यांना ध.मकावले आहे की, त्यांनी कंगनाच्या बाजूने बोलू नये अन्यथा त्यांचीही घरे अशीच पा.डण्यात येतील. यासंबंधित कंगनानं एक ट्वीट केलं आहे.

आज बीएमसीनं माझ्या सर्व शेजाऱ्यांना नोटीस पाठवलं आहे. नोटीसद्वारे बीएमसीनं माझ्या सर्व शेजाऱ्यांना माझ्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितलं आहे. तसेच कोणीही माझ्या बाजूने बोलू नये असंही बीएमसीनं त्यांना सांगितलं आहे, अशी माहिती कंगनानं  ट्वीटरवरून दिली आहे.

बीएमसीनं माझ्या शेजाऱ्यांना ध.मकी दिली आहे की जर कोणी मला साथ दिली तर त्यांच्याही घराचे तेच हाल होतील जे माझ्या ऑफिसचे झाले आहेत. माझ्या शेजाऱ्यांनी महाराष्ट्र सरकार वि,रुद्ध काहीही चु.कीच्या गोष्टी सांगितल्या नाहीत. कृपया त्यांची घरे सोडा, अशी विनंती कंगनानं ट्वीटरवरून केली आहे.

दरम्यान,केंद्र सरकारनं नुकतीच तीन कृषी विधेयकं सादर केली आहेत. केंद्र सरकारनं सादर केलेली विधेयक शेतकऱ्यांच्या विरु.द्ध आहेत, असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे देशातील अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, कंगनानं कृषी विधेयकासंबंधित शेतकऱ्यांचं अपमान करणारं एक ट्विट केलं होतं यामुळे शेतकऱ्यांनी थेट कंगनाविरुद्ध गु.न्हा दाखल केला आहे.

कंगनाचं ट्वीट शेतकऱ्यांचं अ.पमान करणारं आहे, असं म्हणत कंगना राणावत विरुद्ध कर्नाटकच्या तुमकुरच्या एका न्यायालयात फौ.जदारी गु.न्हा दाखल करण्यात आला आहे. कंगना राणावतनं कृषी बिलाचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा ट्विट करून अ.पमान केला आहे, असं कंगना विरुद्ध दाखल केलेल्या के.समध्ये म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘सुशांत प्रकरणी ‘हे’ काम करण्यासाठी रियानं मोठं षडयंत्र आखलं होतं’; एनसीबीचा धक्कादायक खुलासा!

मुकेश अंबानी प्रत्येक तासाला कमवत आहेत 90 कोटी रुपये, एकुण संपत्ती ऐकाल तर हैराण व्हाल!

सुशांतला वि.ष दिलं गेलं होतं? मेडिकल रिपोर्टनं केला धक्कादायक खुलासा!

सुरक्षित इंटरनेट बँकिंगचा वापर करण्यासाठी ‘या’ सहा टिप्स नक्की जाणून घ्या…

एकनाथ खडसे भाजप सोडणार?; कार्यकर्त्यांसोबत बोलतानाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल