तिहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली; एकाच कुटुंबातील तिघांचा खून

अहमदनगर : अहमदनगरमधील शिर्डीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या करण्यात आली आहे. 

शिर्डीजवळील निमगावमध्ये शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. किरकोळ वादातून आरोपीने हे कृत्य केल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ठाकूर यांच्या शेजारी राहणाऱ्या अर्जुन पन्हाळे यांनी किरकोळ वादातून ठाकूर कुटुंबातील तीघांचे कोयत्याने गळे कापले. नामदेव भिका ठाकूर, दगुबाई नामदेव ठाकूर आणि 16 वर्षाच्या खुशी सुनिल ठाकूर यांची हत्या केली आहे.

ठाकूर कुटुंबातील तीघांची हत्या झाली आहे. तर दोन जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. जखमींवर संस्थान रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

आरोपी घटनेनंतर त्याच्या घरी लपून बसला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. या सर्व प्रकारामुळे शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.