पुणे | 10 मार्चला महाविकास आघाडीचं सरकार पडणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
चंद्रकांत पाटील हे मोठे व्यक्ती आहेत, मी लहान कार्यकर्ता आहे. त्यावर काय बोलणार, असा टोला अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. ते बारामतीमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
राज्याच्या आगामी अर्थसंकल्पावर आमचं काम सुरू आहे. मात्र, समाजातल्या गरीब घटकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
विधानसभेतील 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात राज्य सरकारचा काही संबध नाही, सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आहे, त्याचं पालन करावं लागतंय,असंही अजित पवार म्हणाले.
शिवसेना मंत्र्यांच्या निधीवरून त्यांचं काय मत असेल त्यावर मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे आम्ही एकत्र बसून चर्चा करू,आणि त्यावर मार्ग काढू, असं अजित पवार म्हणाले. काही समज, गैरसमज झाले असतील तर दूर करू प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, अजित पवार यांनी अर्थसंकल्प आणि बजाज समुहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांच्या निधनामुळं भारतीय उद्योग क्षेत्रातील पितामह निघून गेल्याची भावना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
“काय फायली काढायच्या त्या काढा, जेवढं भुंकायचं असेल तेवढं भुंका”
श्रीगोंद्यात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; तीन मित्रांचा जागीच मृत्यू
Tata आहे तर शक्य आहे! ‘या’ दोन गाड्यांनी तोडले सर्व रेकॅार्ड्स
बँक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल