“अरे काय पाहिजे सांगा, मी द्यायलाच बसलोय”

नाशिक | आघाडीचं सरकार आहे. मात्र ग्रामविकास, जलसंपदा वित्त नियोजन, अन्न नागरी पुरवठा खातं पवारसाहेबांनी राष्ट्रवादीकडे घेतलं. त्यामुळे अरे काय पाहिजे सांगा मी द्यायलाच बसलोय, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांनी आज नाशिकमध्ये एका कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंचांसह गावकरीही उपस्थित होते. यावेळी भाषणादरम्यान बोलताना अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.

अजित पवारांनी उपसरपंचांच्या पेहारावावरूनही टोलेबाजी केली. राजेंद्र आज असा नटलाय की लग्नात सुद्धा इतका नटला नव्हता, असं अजित पवार म्हणताच उपस्थित हसून हसून लोटपोट झाले.

दरम्यान, एखाद्या ग्रामपंचायत कार्यलयाला लिप्ट असते हे मी इथेच पाहिलं. बारामती चांगी करण्याचा प्रयत्न करतोय पण ग्रामपंचायतीच्या कार्यलयाला लिफ्ट मी इथेच पाहिली, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-सगळे निर्णय अजित पवार घेतायत अन् मुख्यमंत्री गोट्या खेळतायत; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका

-हिटलरने जे जर्मनीत केलं तेच भारतात घडवण्याचा प्रयत्न; आव्हाडांचा घणाघाती आरोप.

-“नरेंद्र मोदींचं मानसिक संतुलन बिघडलं आहे”

-जामियामध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचा हिंदू महासभेकडून होणार सत्कार!

-तुम्ही अ‌ॅक्सिडंटल मुख्यमंत्री आहात का? संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणतात…