राजीव गांधींचं ‘ते’ स्वप्न मी पूर्ण करणार- स्मृती इराणी

लखनऊ : अमेठी-सुलतानपूर रेल्वे मार्गाने जोडण्याचं स्वप्न दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी पाहिलं होतं. तेच स्वप्न आता पूर्ण करण्याचा निर्धार केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे.

रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि स्मृती इराणी यांच्या बैठकीनंतर प्रलंबित राहिलेल्या प्रकल्पाचे काम सुरु झाले आहे. 

34. 36 किलोमीटर लांबीच्या या मार्गात 37 गावे येणार असून सर्व्हेचे कामही पूर्ण आहे. या रेल्वेमार्गासाठी 133.36 हेक्टर जमिनीची आवश्यकता असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

2013 साली खासदार असलेले राहुल गांधी यांनी या भूमीचे पूजन केले होते. मात्र प्रत्यक्षात हे काम सुरु होऊ शकलं नाही. असंही सांगण्यात आलं आहे. 

सुलतानपूरमधील दिखौली, धम्मौर आणि अमेठीमधील पिंडोरिया या ठिकाणी रेल्वे स्थानकं बांधण्यात येतील. या रेल्वे स्थानकामुळं रायबरेली, बाराबंकी आणि आयोध्या हे मार्ग एकमेकांशी जोडले जाणार असल्याचं सांगितलं आहे. 

सुलतानपूर जिल्ह्यातील भूसंपादनासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. अमेठीतील भूसंपादनासाठीही निधीची लवकरच तरतूद करण्यात येईल, असं स्मृती इराणींचे प्रतिनीधी विजय गुप्ता यांनी सांगितलं आहे.