“कितीही विरोध झाला तरी चालेल पण आता माघार नाही”

नवी दिल्ली |  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीएएच्या मुद्यावरून पुन्हा विरोधकांना लक्ष केलं आहे. सुधारित  नागरिकत्व कायद्याला विरोध सुरु असला तरी माघार घेतली जाणाार नाही, असं अमित शहा यांनी म्हटलंय.

अमित शहा यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या सभेत या कायद्याच्या अंमलबजावणीचा पुनरुच्चार केला आहे. या कायद्यात देशातील कोणाचंही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही. मात्र, या कायद्याबाबत काँग्रेससह विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी टीका अमित शहा यांनी केली आहे.

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील अल्पसंख्य हिेंदूंना नागरिकत्व द्यावं, अशी सूचना याआधीही काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती, असंही अमित शहांनी म्हटलं. विरोधकांनी आपल्याशी जाहीर चर्चेला समोर यावं, असं आव्हानही शहांनी दिलं आहे.

दरम्यान, सीएएविरोधात निदर्शने आणि जाळपोळीसाठी काँग्रेस सहाय्य करत असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-मातोश्रीबाहेर आंदोलन करणारा ‘तो’ शेतकरी फडणवीसांच्या भेटीला

-“फक्त झेंड्याचा रंग बदलून चालणार नाही तर मनसैनिकांनी त्यांची मनं देखील बदलली पाहिजेत”

-“राहुल गांधीनी आधी स्वत:च्या आजीचा इतिहास सांगावा आणि मग सावरकरांवर बोलावं”

-मुंबई महापालिकेत शिवसेनेची जोरदार कोंडी करा; फडणवीसांनी नगरसेवकांना दिले आदेश

-“चव्हाणांच्या दाव्याने खळखळ किंवा खळबळ होण्याचं कारण नाही”