मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्चर्यकारकरित्या सोशल मीडियापासून दूर राहण्याचे संकेत दिले. जगभरात मोठ्या प्रमाणात फॅन फोलोअर्स असणाऱ्या मोदींच्या मनात हा विचार नेमका का आला? याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यातच असताना दुसरीकडे त्यांच्या चाहत्यांना नेमत्या काय प्रतिक्रिया द्याव्यात, हे कळेनासं झालंय. त्यांनी सोशल मीडिया सोडू नये यासाठी ट्वीटरवर ट्रेंड सुरू झाला आहे. तर पंतप्रधान जर असा निर्णय घेत असतील आम्हीही तसं करू, असा पवित्रा काही जणांनी घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल.
अमृता फडणवीस यांनी मोदींच्या मार्गाचा अवलंब करणार असल्याचं म्हटलं आहे. छोटे छोटे निर्णयही तुमचे आयुष्य बदलू शकतात, मोदींना फॉलो करत सोशल मीडियाचा वापर करणे टाळणार असल्याचे अमृता यांनी म्हटलं आहे. त्यांनी यांसदर्भात ट्विट केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय सर्वांना आश्चर्यचकित करणार आहे. मोदी यांची सोशल मीडियात जोरदार क्रेझ आहे. त्यांच्या फेसबुक पेजला 4 कोटी 47 लाख फाॅलोवर्स आहेत तर ट्विटरवर त्यांना 5 कोटी 33 लाख लोक फाॅलो करत आहेत.
मोदींच्या या ट्वीटनंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजप नेत्यांनी काहीशा सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर विरोधी पक्षांनी मात्र मोदींच्या निर्णयावर काडाडून प्रहार केले आहेत.
Sometimes it’s the smallest decision that can change our life forever ! I will follow the path of my leader !! https://t.co/D7l1iZcosS
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 2, 2020
महत्त्वाच्या बातम्या-
-राहुल गांधींनी मोदींना दिलेला सल्ला भाजपला झोंबला; ट्वीट करत चढवला हल्ला
-“जीडीपी घसरायला लागला की लागले टीआरपी स्टंट करायला”
-मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या विचारावर राहुल गांधींचा खोचक टोला
-हा भाजप नेता म्हणतो, मोदींनी सोशल मीडिया सोडलं तर मी देखील सोडेन!
-पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सोशल मीडियाला गुडबाय? मोदींची ट्वीट करून माहिती