“रामदास आठवले मुर्ख आहेत… आजपर्यंत तळवे चाटूनच त्यांनी पदं मिळवलीत”

मुंबई | रामदास आठवले मुर्ख आहेत. त्यांचा मुर्खपणा सगळ्या जगाला ठावूक आहे.  तळवे चाटूनच त्यांनी पदं मिळवलीत, अशी गंभीर आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. 

बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम त्यांच्या नातवांमुळेच अडलं आहे, अशा आशयाचं विधान रामदास आठवले यांनी केलं होतं. त्यावर आज आनंदराज आंबेडकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

आठवलेंनी इंदू मिलचं काम बघावं. कसं चाललं आहे, हे बघावं. त्यानंतर त्यांनी बोलावं. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असंही आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलं.

आठवलेंना मी कधीही नेता मानलेलं नाही. जे सत्तेत येतील त्यांचे तळवे चाटण्या पलिकडे या माणसाने काहीही केलेलं नाही. त्यांना जे नेता समजतात ते मुर्खांच्या नंदनवनात जगतात, असंही आनंदराज आंबेडकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-