अण्णांवर प्रेम करणारी शेवंता त्यांच्यापासून दूर जाणार?

मुंबई : गूढ कथानक व मालवणी भाषेमुळे रात्रीस खेळ चाले – २ ही मालिका प्रेक्षकांमध्ये खुपच लोकप्रिय झाली आहे. प्रेक्षकांना वारंवार आश्चर्यचकित करणाऱ्या या मालिकेतील कथानकाने आता नवीन वळण घेतले आहे. आतापर्यंत अण्णांवर प्रेम करणारी शेवंता आता त्यांच्यापासून दूर जाणार आहे.

शोभावर गोळी झाडल्याप्रकरणी अण्णांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. शेवंता त्यांना तुरुंगात भेटायला येते परंतु तिचे बदललेले रुप पाहून अण्णा आश्चर्यचकित होतात. तुरुंगातून सुटका होताच क्षणी शेवंताच्या प्रेमात आकंठ बुडालेले अण्णा तिच्या घरी जातात.

शेवंता आता माझे तुमच्यावर प्रेम राहिलेले नाही, अशी अप्रत्यक्षरित्या कबूली देते. या कथानकामुळे आता शेवंता आता अण्णांपासून दूर जाणार असे म्हटले जात आहे.

रात्रिस खेळ चाले – २ ही एक प्रिक्वेल मालिका आहे. या मालिकेच्या पहिल्या सत्रात शेवंताच्या खूनाचे कथानक दाखवण्यात आले होते.

पोलीसांनी अथक प्रयत्न करुनही तिच्या खुनाचा उलगडा झाला नव्हता. सध्याचे कथानक पाहत शेवंताने अण्णांना फसवले हा राग मनात ठेवून त्यांनीच तिचा खून केला होता का? अशी चर्चा सध्या प्रेक्षकांमध्ये रंगत आहे.

महत्वाच्या बातम्या-