मुंबई | बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युनंतर बॉलीवूड क्वीन कंगना रनौतने नेपोटीजमविरुध्द जणू बंडच पुकारलं आहे. सुशांतचा मृत्यु झाल्यापासून कंगना सातत्याने सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज सुशांतप्रकरणी तपास सीबीआयकडे सोपविला आहे. सीबीआयकडे तपास जाताच कंगनानं ट्वीटरच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला आहे.
मानवता जिंकली, सुशांत सिंह राजपूत योद्ध्यांपैकी प्रत्येकाचं अभिनंदन. प्रथमच मला सामुहिक चेतनांची अशी तीव्र शक्ती अनुभवायला मिळाली आहे, असं कंगनानं तीच अधिकृत ट्वीटर अकाउंट मानलं जाणाऱ्या ‘टीम कंगना रनौत’ या अकाउंटवरून म्हटलं आहे.
सुशांत राजपूत प्रकरण सीबीआयकडे गेल्यानं, सुशांतला न्याय मिळावा अशी मागणी करणाऱ्या प्रत्येक योद्ध्याचं कंगनानं अभिनंदन केलं आहे. तसेच याप्रकरणी मानवतेचा विजय झाल्याचंही तीनं म्हटलं आहे.
दरम्यान, सुशांत राजपूत प्रकरण सीबीआयकडे गेल्यानंतर अनेकांनी ट्वीटरवरून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटरवरून याप्रकरणी ‘सत्यमेव जयते!’ अशा एकसारख्या प्रतिक्रिया दिल्याने राजकीय वर्तुळात सध्या चर्चांना उधान आलं आहे.
Humanity wins, congratulations to each one of SSR warriors, first time I felt such strong force of collective consciousness, AMAZING 👏👏👏#CBITakesOver
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 19, 2020
महत्वाच्या बातम्या-
सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; भाजप नेत्या आणि शरद पवारांच्या नातवाची एकच प्रतिक्रिया!
महाराष्ट्र सरकारने सुशांतच्या प्रकरणावर आत्मचिंतन करण्याची गरज; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका
सुशांतच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
चौकशीच्या घेऱ्यात सापडलेल्या रियाला मोठा चक्रवर्ती झटका!
…म्हणून शरद पवारांनी पत्र लिहित नरेंद्र मोदींना केली ‘ही’ मागणी!