“चंद्रकांत पाटील भला माणूस, त्यांना हिमालयात सोडवायला मी पण जाणार”

सातारा | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. निवडणूक हारलो तर राजकारण सोडून हिमालयात जाईल, असं चंद्रकांत पाटील एका सभेत म्हणाले होते.

त्यानंतर आता चंद्रकांत पाटलांचं हे वक्तव्य धरून राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटलांसाठी चक्क तिकीट देखील बुक करून दिलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना खोचक टोला लगावला होता.

त्यानंतर आता पुन्हा जयंत पाटलांनी याच मुद्द्यावरून चंद्रकांत पाटलांना डिवचलं आहे. चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील तर मी पण सोबत जाणार, कारण उन्हाळा येतोय आणि चंद्रकांत पाटील भला माणूस आहे, माझ्या ओळखीचे आहेत, अशी मिश्कील टिपण्णी जयंत पाटील यांनी केली आहे.

भाजपने त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून काढू नये, त्यांना तिथेच ठेवावं, ते चांगलं काम करत आहेत, अशा सल्ला देखील भाजपला दिला. तर मुंबईमध्ये मनसेसोबत आघाडी केली तर त्याचा फटका भाजपला बसेल, असं वक्तव्य देखील जयंत पाटील यांनी केलं आहे.

राज ठाकरे सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. ते आता कुणाच्या तरी हातातलं भाऊलं झालेत. ते नकलाकार आहेत, त्यांचं काय कौतूक करता, असं म्हणत जयंत पाटलांनी राज ठाकरे यांना फटकारलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा होणार आहे. त्यामुळे आता राज्यात हिंदूत्वाची रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. त्यावर राष्ट्रवादीने संयमाची भूमिका घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या कटात राज ठाकरेंचा सहभाग”

आर. माधवनच्या लेकाचा देशाला अभिमान; केली ‘ही’ कामगिरी

“आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, नाहीतर…”; तालिबान्यांचा थेट पाकड्यांना इशारा

हस्तमैथुन करणं ठरू शकतं धोकादायक; 20 वर्षाच्या मुलासोबत जे काही झालं ते…

IPL 2022: DK पुन्हा टीम इंडियात कमबॅक करणार?; विराट कोहली म्हणाला…