मुंबई | कोरोनासारख्या जागतिक संकटकाळात पालकत्वाची जबाबदारी निभावण्यात केंद्र सरकार साफ अपयशी ठरले असून, त्यांनी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे ‘खोदा पहाड, निकला जुमला’ ठरले आहे, अशी टीका ठाकरे सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती. त्यांच्या या टीकेचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
राज्यात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जे काम सुरू आहे ते केंद्र सरकारच्या मदतीने चालू आहे. केंद्रावर टीका करण्याआधी तुमच्या तिजोरीतून महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगा, अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी अशोक चव्हाणांना केली आहे.
देशातील सर्वाधिक कोरोना रूग्ण महाराष्ट्रात असूनही महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेचे पालकत्व पार पाडण्यासाठी स्वतंत्रपणे काहीही केलं नाही. उलट केंद्राने जी सामान्य लोकांना मदत केली त्यामध्ये अडथळे आणण्याचं काम राज्य सरकारने केला, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने आपल्या शेजारील राज्य कर्नाटकने 1600 कोटी रूपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार स्वतच्या खजिन्यातन कोणतंही मोठं पॅकेज जाहीर करत नाही. आता राज्य सरकारने कोरोनाच्या कठीण काळात स्वतंत्रपणे काय केलं, हे दाखवून द्यावं, असं पाटील म्हणाले आहेत.
केंद्र सरकारवर पालकत्वाच्या जबाबदारीवरून टीका करण्याच्या आधी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारने आपल्या तिजोरीतून कोरोनाच्या संकटात राज्यासाठी स्वतंत्रपणे काय केले याचा हिशेब द्यावा. pic.twitter.com/huMZL3N4z1
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 17, 2020
महत्वाच्या बातम्या-
-निर्मलाआक्का, इथं संवेदना अन् माणुसकी व्यक्त होते; आव्हाडांकडून सीतारामन यांचा समाचार
-बारामतीत पुन्हा कोरोनाबाधित रूग्ण आढळला; पाहा ‘मुंबई ते बारामती कोरोना कनेक्शन…!’
-उद्योग क्षेत्रातील संधीचा मराठी तरूणांनी फायदा घ्यावा, सरकार आपल्या पाठीशी- उद्योगमंत्री
-खळबळजनक! गुजरातमध्ये कोरोना रुग्णाचा मृतदेह बस स्टँडवर आढळला
-“संज्या म्हणतो ग्राउंड ताब्यात घ्या, आदित्य म्हणतो पावसाने बेड भिजतील; असले राज्यकर्ते….?”