“…तर शिवसेनेचे 56 आमदार त्यावेळी तुमच्यासोबत दिसले असते”

पंढरपूर | चंद्रकांत पाटील सतत काही ना काही टीका करत असतात. त्यावेळेस ते संयमाने वागले असते तर शिवसेनेचे 56 आमदार आज भाजपसोबत दिसले असते, असा टोला शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

कोरोनाचं संकट कमी झाल आहे. आता कायमस्वरूपी हे कोरोनाचे संकट दूर कर, असं साकडं पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी घातलं.

जळगावमध्ये भाजपमधून शिवसेनेत आलेले अनेक नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये निघाले आहेत यावरही पाटलांनी भाषय केलं.

भाजप त्यांना अपात्रतेची भीती दाखवत आहे. त्यामुळेच हे नगरसेवक आता भाजपकडे जाताना दिसत आहेत, असं त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका करणं म्हणजे उंदराने काहीतरी चिंधी पकडणं, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे.

राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र हे पॅकेज शेतकऱ्यांसाठी अपुरं असल्याची खंतही पाटील यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“चित्र वाघ यांनी आपण कोणत्या मनोवृत्तीचे आहोत हे दाखवून दिलं”

गांजा आणि तंबाखूमधील फरक एनसीबीला कळतो की नाही?- नवाब मलिक

तुम्ही कोणते टगे पोसत आहात ते पाहा- प्रीतम मुंडे

“आता नरेंद्र मोदींच्या नावाने मतं मिळतील याची काही शाश्वती नाही”

वर्मावर बोट ठेवत देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला, म्हणाले…