“नागपूरच्या बाराच्या बारा जागा भाजपच जिंकेल”

नागपूर : आज मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नागपूरच्या बाराही जागा भाजपाच्या येतील. विदर्भात अभुतपू्र्व विजय आम्हाला प्राप्त होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जनतेचे आम्हाला आशिर्वाद मिळालेले आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

नागपूर जिल्ह्यातील सर्व बाराही जागा भाजप जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नागपूर साऊथ वेस्ट या मतदारसंघातून शुक्रवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करताना जोरदार शक्तीप्रदर्शन पाहायला मिळालं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना नागपूरमध्ये भाजपच्या सर्व जागा निवडणून येतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

गेल्या पाच वर्षात आम्ही महाराष्ट्रात जे काम केलंय तसेच देशात मोदींच्या नेतृत्वात जी सकारात्मक लाट आहे, त्यामुळे आमच्या महायुतीला चांगला विजय मिळेल, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपने जाहीर केलेल्या चौथ्या यादी विनोद तावडे आणि भाजप नेते एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली नाही.

महत्वाच्या बातम्या-