ज्या किल्ल्यांना इतिहास नाही, त्याच किल्ल्यांसाठी हा निर्णय लागू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे |  ज्या किल्ल्यांना इतिहास नाही, त्याच किल्ल्यांसाठी हा निर्णय लागू असून छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा सम्राज्याचा इतिहास ज्या किल्ल्यांशी संबंधित आहे अशा एकाही किल्ल्याला नखभर देखील धक्का आम्ही लागू देणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते आज पुण्यात बोलत होते.

राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. या सगळ्या बातम्या अफवा असून वर्ग 1 चे किल्ले शिवाजी महाराजांचे असून त्यांच्याबद्दल कोणताच निर्णय घेण्यात आला नसल्याचं पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांनी देखील पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचं हेच विधान अधोरेकित केलं आहे.

राज्यात वर्ग 1 आणि वर्ग 2 असे दोन प्रकारचे किल्ले आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात. तर सुमारे 300 किल्ले हे वर्ग 2 मध्ये येतात, अशी माहिती जयकुमार रावल यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि आमच्या मराठ्यांचा जो काही इतिहास आहे. याच्याशी संबंधित कुठल्याही किल्ल्यावर कुठल्याही गोष्टीची कधीच परवानगी मिळणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, जयकुमार रावल यांनी सिंधुदुर्ग हा जलदुर्ग स्वतः शिवरायांनी बांधला तो वर्ग 2 मध्ये येतो का? याचं उत्तर तातडीने द्यावं, असं काँग्रेस नेते आणि माजी खासदार राजीव सातव यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-