सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या ‘या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षिय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, महादेव जानकर , जयंत पाटील, राज ठाकरे, इम्तियाज जलील, अशोक ढवळे, कपिल पाटील, राजेंद्र गवई उपस्थित होते.

या बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?-

-कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी वेळोवेळी केलेल्या सूचनांची नेहमी गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट नक्कीच दूर करू.

-लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्याने एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रसार अत्यंत चांगल्या पद्धतीने रोखला आहे, आता मे अखेरपर्यंत आपल्याला ही साथ वाढू द्यायची नाहीये. सर्वांनी सहकार्य केल्यास यात यश येईल.

-आज कोरोनाशी मुकाबला करत असताना आपल्याला २ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. ही अभूतपूर्व परिस्थिती असल्याने केवळ आपले राज्यच नव्हे तर देश आणि जगही यामध्ये होरपळून निघत आहे.

-माझे आपल्याशी अधून मधून दूरध्वनीवरून बोलणे सुरूच असते. आपल्या सूचना मी नेहमी ऐकत असतो, माध्यमांमधूनही मी वाचत असतो. त्या सूचना योग्य असतील तर मी त्या लगेच प्रशासनाला कळवत असतो.

-केंद्र सरकार सुद्धा कोरोनाच्या नियंत्रणात आपल्याला खूप सहकार्य केले आहे. मग ते पंतप्रधान, गृहमंत्री, असो किंवा केंद्रीय आरोग्य मंत्री असोत. पंतप्रधान मार्गदर्शनासाठी सहजपणे उपलब्ध असतात. तसेच आत्तापर्यंत आम्हा मुख्यमंत्र्यांची आणि त्यांची व्हीसीद्वारे बैठकही झाली आहे. आपण प्रसंगी टीका करीत असताल पण त्यात आपला उद्देश उणीवा निदर्शनास आणून शासनाला सुचना करणे असा असतो.

-आपण केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात रुग्ण संख्या वाढली नाही मात्र मेअखेरीपर्यंत आपल्याला अजून काळजी घ्यायची आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढते आहे, मात्र बीकेसी, वरळी , रेसकोर्स अशा ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावर विलगीकरण केंद्रं उभारली आहेत.

-आपण चाचण्यांची संख्याही वाढवली आहे. व्हेंटिलेटर्सपेक्षा ऑक्सिजनची गरज आहे. परराज्यातील नागरिकांनाही पुरेशी काळजी घेऊन आम्ही पाठवत आहोत. राज्यांतर्गत लोकांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी व्यवस्थित काळजी घेण्यात येईल, जेणेकरून ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये धोका वाढणार नाही.

-केंद्रीय संस्था, लष्कर, पोर्ट ट्रस्ट, यांना आम्ही आयसीयू बेड्स उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. मुंबईतून देखील परराज्यातील कामगार नेण्यासाठी रेल्वे सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे

-मालेगाव व औरंगाबाद येथे कंटेनमेंट झोन्समध्ये अधिक शिस्त ठेवण्याची गरज आहे, तेथील लोक प्रतिनिधींनी सहकार्य करावे अशी विनंती त्यांना केली आहे. ना मदत करावी

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यक्षमतेवरच देवेंद्र फडणवीस यांचं प्रश्नचिन्ह

-मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टोचले सरकारचे कान

-परप्रांतीय गावी गेल्याने उपलब्ध रोजगार स्थानिकांना द्या; राज ठाकरेंची मागणी

-लॉकडाऊन शिथील करायच्या वेळी तुमचा प्लॅन काय असणार? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

-मजुरांचे जथ्येच्या जथ्ये सरकारला अशोभणीय; लॉकडाऊनच्या सरकारी उपाययोजनांवर भुजबळ यांची नाराजी