कोणत्याही शहराला लॉकडाऊन करणार नाही पण… मुखमंत्र्यांचं जनतेला आवाहन

मुंबई | कोरोना व्हायरसचा फैलाव वाढत असल्याने राज्य सरकारने मोठा निर्णय घेत महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आपल्यासाठी पुढचे पंधरा ते सोळा दिवस जास्त महत्त्वाचे आहेत. शासनाच्या संपर्कात राहा. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका त्यासोबत सर्व नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

येत्या दिवसात पुढचं मोठं दिवस संकट टाळण्यासाठी मंदिर, मस्जिद आणि चर्चमध्ये गर्दी करू नका. कोणत्याही शहराला लॉकडाऊन करणार नाही. मात्र सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या एकूण 39 पर्यंत गेली आहे. सर्वाधिक रूग्ण हे पिंपरी-चिंचवड आणि त्यापाठोपाठ पुण्यात असल्याची माहिती समजत आहे.

महत्वाच्या बातम्या-

तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भविकांना करावी लागणार 31 मार्चपर्यंत प्रतिक्षा

-“कोरोना व्हायरस म्हणजे अल्लाहने चीनला दिलेली शिक्षा आहे.”

-उद्धव ठाकरेंनी का बरं राजीनामा द्यावा? तृप्ती देसाईंचा चंद्रकांत पाटलांना सवाल

-चिकन, मटन, मासे बिनधास्त खा आणि तंदुरस्त रहा; मुख्यमंत्र्यांची फेसबुक पोस्ट

-बुद्धीबळपटू विश्वनाथ आनंद कोरोनामुळे अडकला जर्मनीत