नागपूर | सलग तीन वेळा निवडून आलेले काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. गोंदिया जिल्ह्यातील वजनदार नेते म्हणून गोपालदास अग्रवाल यांची ओळख आहे. त्यांच्या भाजपप्रवेशाने विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
सलग तीन वेळा आमदार राहिलेले गोपालदास अग्रवाल यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अग्रवाल यांची स्थानिक राजकारणात मजबूत पकड आहे.
शिवसेनेसोबत युती झाली असून आज किंवा उद्या भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल, असं मुख्यमंत्री या पक्षप्रवेशादरम्यान म्हणाले.
गोंदियाची जागा आम्ही कधीच जिंकलो नाही, पण आता गोपालदास अग्रवाल भाजपत आलेत. त्यामुळे ही जागा आम्ही निश्चितपणे जिंकू, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
2014 ला सरकार स्थिर ठेवण्यासाठी राजीनामा देण्याची तयारी गोपालदास अग्रवाल यांनी दाखवली होती. तेव्हापासून गेली पाच वर्ष ते मनाने आमच्यासोबत आहेत. पीएससीचे अध्यक्ष म्हणून गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे घोटाळे उघड केले, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
महत्वाच्या बातम्या–
निवडणूक लढवण्याचा निर्णय माझ्यासाठी नाही तर जनतेच्या स्वप्नांसाठी- आदित्य ठाकरे https://t.co/wA9HQEhcQa @AUThackeray @Shivsena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 30, 2019
वंचितची दुसरी यादी प्रकाश आंबेडकरांनी केली जाहीर! https://t.co/595LEjEmJa @VBAforIndia
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 30, 2019
रिझर्व्ह बँकेकडून नुसतेच पैसे घेत सुटलात… हे सरकार दिवाळखोरीत आहे काय??- ओवैसी https://t.co/MqGYuqBBXw @asadowaisi @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 30, 2019