“कॉंग्रेसने सचिन सावंत यांच्यासारख्या आक्रमक, अभ्यासू पदाधिकाऱ्याला संधी द्यायला हवी होती”

मुंबई |  विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी त्याचबरोबर भाजपने आपापले उमेदवारी जाहीर केले आहेत. कुणी जुन्या जाणत्या नेत्यांना संधी दिली आहे तर कुणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यावरच आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे.

काँग्रेसकडून सचिन सावंत यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळेल, अशी शक्यता होती. त्यांचं नाव देखील संभाव्य उमेदवारांमध्ये आघाडीवर होतं. म्हणूनच सचिन सावंत यांच्यासारख्या आक्रमक, अभ्यासू पदाधिकार्‍याला संधी मिळेल असे वाटत होते. पण ती मिळाली नाही, अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.

सचिन सावंत यांच्याबरोबर विदर्भाचे अतुल लोंढे यांचेही नाव चर्चेत होते, पण कोणास फारसे माहीत नसलेले राजेश राठोड व पापा मोदी ही मराठवाड्यातील नावे समोर आली. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीच्या ‘पेल्यात’ थोडा खळखळाट झाला. मात्र आता काँग्रेस पक्षाने एकच उमेदवार रिंगणात ठेवल्याने निवडणुकीचा मार्ग सुकर झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला आणि परंपरेला अनुसरूनच हे घडत आहे, असं राऊत म्हणाले आहेत.

दुसरीकडे भाजपने दिलेल्या उमेदवारांवर देखील राऊत यांनी भाष्य केलं आहे. भाजपने आपले उमेदवार जाहीर करून पक्षातील प्रस्थापितांना धक्काच दिला आहे. ‘भाजपला मत देऊ नका,’ असे जाहीर सभांतून सांगणार्‍या गोपीचंद पडळकरसारख्यांना उमेदवारी दिली आहे, असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘माघारी’पेक्षा महाराष्ट्राचे हित महत्त्वाचं होतं, काँग्रेसच्या भूमिकेचं सामनामधून कौतुक

-“कतरिना माझ्याकडे आली अन् मिठी मारुन मला म्हणाली…”

-धक्कादायक! उरणमध्ये एकाच कुटुंबातील 21 जणांना झाली कोरोनाची बाधा

-प्रेरणादायी! 85 वर्षांच्या आजी मजूरांना देतायत 1 रुपयात इडली चटणी

-…म्हणून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरींना मिळाली विधान परिषदेची उमेदवारी!