तुमच्याकडे 170 होते तर कसली भीती होती?- देवेंद्र फडणवीस

मुंबई | महाराष्ट्र विधानसभा इतिहासात हंगामी अध्यक्षाने बहुमताचा प्रस्ताव मांडला नाही. नव्याने हंगामी अध्यक्ष का बदलले? सगळ्या गोष्टींची पायमल्ली होत आहे. तुमच्याकडे 170 होते तर कसली भीती होती? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारला केला आहे.

अधिवेशनाची सुुरुवात वंदे मातरमने व्हायला हवी होती. 27 नोव्हेंबरला राष्ट्रगीत झालं म्हणजे अधिवेशन संस्थगित झालं. अधिवेशन पुन्हा बोलावण्यासाठी राज्यपालांच्या समन्सची गरज होती. राज्यपालांचं समन्स नसल्याने हे अधिवेशन नियमाला धरून नाही, असंही फडणवीस म्हणाले.

आज ठाकरे सरकारचा विश्वासदर्शक ठराव पार पडत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी पहिले पाच मिनिटे अतिशय वादळी भाषण करत नव्या सरकारवर हल्लाबोल केला.

शिरगणती सुरू होण्याआधीच भाजप आमदारांनी सभात्याग केलेला आहे. महाविकास आघाडीचा विजयाचा मार्ग यामुळे मोकळा झालेला आहे.

महत्वाच्या बातम्या-