सध्या एकमेकांना आडवा आणि एकमेकांची जिरवा अशीच परिस्थिती- फडणवीस

सोलापूर | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. सध्या एकमेकांना आडवा आणि एकमेकांची जिरवा अशी परिस्थिती तयार झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अकलुज येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

महाराष्ट्राचा दुष्काळ हटवायचा असेल तर पाण्याचा थेंब न थेंब जमिनीत मुरला पाहिजे. यासाठी भाजप सरकारनं जलयुक्त शिवार, जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात सुरु केली होती. पण आता पाणी आडवा आणि पाणी जीरवा असं म्हणण्याऐवजी एकमेकांना आडवा आणि एकमेकांची जिरवा अशीच परिस्थिती असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

आमच्या सरकारच्या काळात सुरु झालेल्या योजना या नव्या सरकारने बंद करण्याचा सपाटा लावला आहे. तुम्ही योजना थांबवू शकता, पण सहभाग कसा थांबवणार? लोकांनी हे काम हातात घेतलं आहे, असंही ते म्हणाले.

फडणवीसांनी कर्जमाफी मुद्द्यावरुनही सरकारवर टीका केली. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-