मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने नाणार आणि आरे आंदोलकांवरच्या केसेस मागे घेतल्या आहेत. सत्तेत आल्याच्या पहिल्याच आठवडयात त्यांनी केसेसे मागे घेण्याचा धडाका लावला आहे. यावरच भाजप नेत्यांने जोरदार टीका केली आहे. नशीब कसाबला फाशी झाली नाही तर सरकारने त्याच्यावरच्याही केसेस मागे घेतल्या असत्या, असं भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर टीका करत त्यांना राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे..
सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून ‘वाघा’सारखी जनावरं काहीही बरळत सुटली आहेत. आपल्या हक्कासाठी झटणाऱ्या आंदोलनकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी करताना यांना लाजा वाटत नाही का?, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी वाघ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजपच्या नेतृत्वाने या वाचाळवीराच्या नीच वक्तव्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेची ताबडतोब माफी मागावी, अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.
दरम्यान, अवधूत वाघ यांच्या वक्तव्यावर शिवसेना नेत्यांनी देखईल कडाडून टीका केली आहे.
सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून ‘वाघा’सारखी जनावरं काहीही बरळत सुटली आहेत.आपल्या हक्कासाठी झटणाऱ्या आंदोलनकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी करताना यांना लाजा वाटत नाही का?भाजपच्या नेतृत्वाने या वाचाळवीराच्या नीच वक्तव्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेची ताबडतोब माफी मागावी.@Avadhutwaghbjp pic.twitter.com/PvQ5z4TGBI
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 5, 2019
महत्वाच्या बातम्या-
कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समिती काढणार थेट विधानभवनावर मोर्चा! – https://t.co/Xa2rwksWyY #KadaknathKombadi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019
“अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावं” – https://t.co/9O8sapfnz4 @RamdasAthawale
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019
‘मला विधानसभेत जाण्यापासून रोखलं’; राज्यपालांचा खळबळजनक आरोप! – https://t.co/ytZwxwSt7a @MamataOfficial
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019