“अडवाणी जिथे जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली”

भोपाळ | माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या सनराइज ओव्हर अयोध्या: द नेशनहूड इन अवर टाईम्स या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने दिग्विजय यांनी भाजपच्या विचारसरणीवर टीकास्त्र सोडलं आहे.

1984 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार जागा मिळाल्या, तेव्हा अटलबिहारी वाजपेयींच्या गांधीवादी समाजवादीला यश मिळू शकले नाही हे स्पष्ट झाले. यानंतर पक्षाने रामजन्मभूमी बाबरी मशीद हा राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा निर्णय घेतला, असं त्यांनी म्हटलंय.

दिग्विजय सिंह यांनी देशातील द्वेषाच्या वातावरणासाठी अडवाणींना जबाबदार धरलं आहे. 1984 नंतर भाजपने कट्टर हिंदुत्वाचा मार्ग अवलंबला जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा आधार आहे. अडवाणींच्या रथयात्रेने देशभरातील समाजात फूट पाडली. अडवाणी जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली, असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे.

सलमान खुर्शीदने त्यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना ISIS आणि बोको हरामशी केली आहे. रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही त्यांनी कठोर भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हिंदु राष्ट्राच्या विचारसरणीच्या विरोधात असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सावरकर हे धार्मिक नव्हते, त्यांनी गाईला केवळ एक उपयुक्त प्राणी मानले होते. तसेच गोमांस खाण्यात काहीच चुकीचे नसल्याचे देखील सावरकर म्हणत असत. त्यांनी हिंदूची ओळख निर्माण करण्यासाठी हिंदुत्व हा शद्ब प्रचारात आणला. त्यापलीकडे हिंदुत्वाचा आणि हिंदू धर्माचा संबंध नाही. मात्र भाजपाने आपल्या राजकारणासाठी हिंदुत्वाचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याची टीका काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केली आहे.

जपाकडून जाणीवपूर्वक हिंदू धर्म संकटात असल्याचा प्रचार करण्यात येतो, मात्र त्यात तथ्य नाही. भारतावर 500 वर्ष मुस्लिम शासकांचे राज्य होते. त्यानंतर दीडशे वर्ष इंग्रज आले. मात्र तरी देखील हिंदू धर्म आहे तसाच राहिला. मग आता हिंदू धर्म संकटात कसा, असा सवालही दिग्विजय सिंग यांनी केला आहे.

महात्मा गांधींना जे अभिप्रेत होतं, ते खरं राम राज्य होतं. मात्र आता रामराज्य राहिले नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद पाडण्यात आली, ही घटना अंत्यत चुकीची होती, असंही त्यांनी म्हटलं.

कोर्टाच्या निर्णयानंतर वर्षभरात सर्वांची सुटका करण्यात आली. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. मात्र तरी देखील काही लोक धार्मीक मुद्दे उपस्थित करून राजकारण करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्र्यांकडून नवाब मलिकांचं कौतुक, म्हणाले…’गुड गोईंग’ 

‘पद्म पुरस्कारासाठी मी लायक नाही’; आनंद महिंद्रा यांचं वक्तव्य चर्चेत 

आता इंस्टाग्राम खर्चिक होणार; मोजावे लागणार ‘इतके’ रूपये

रामदास कदमांचा पत्ता कट? ऑडिओ क्लिप प्रकरण भोवण्याची शक्यता

ठाकरे सरकारचा फडणवीसांना दणका! आता ‘या’ प्रकरणाची चौकशी होणार