मुंबई : विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. मात्र भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन बेकायदा असल्याचा आरोप केला. फडणवीस यांच्या या आरोपामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता.
हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मुद्दा शांतपणे ऐकून घेतला. त्यानंतर आपल्या याआधीच्या विधानसभा अध्यक्षपदाचा अनुभव वापरत त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे फडणवीसांचा मुद्दा खोडून काढला.
विधीमंडळाचं अधिवेशन संस्थगित केल्यास 7 दिवसांच्या आत ते पुन्हा बोलावलं जाऊ शकतं, हा महत्त्वाचा नियम वळसे पाटलांनी फडणवीसांच्या निदर्शनास आणून दिला. या अधिवेशनासाठी राज्यपालांची परवानगी घेण्यात आलेली आहे, त्यांच्या आदेशानूसार हे अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे, त्यामुळे हे अधिवेशन पूर्णपणे नियमाला धरुन आहे, असं वळसे पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र वळसे पाटील यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर हा मुद्दा हाणून पाडला.
महत्त्वाच्या बातम्या-
या पठ्यानं घेतल्या 6 चेंडूत तब्बल 5 विकेट; मैदानावर घातलं धुमशान!- https://t.co/Xjc9ImAuBZ @BCCIdomestic @ICHOfficial @IPL @abhimanyumithun @himanshurane @cricketworldcup
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
“चंद्रकांत पाटील आवरतं घ्या, नाहीतर महाराष्ट्र पेटायला वेळ लागणार नाही” – https://t.co/I54iwcHwUH @Awhadspeaks @ChDadaPatil
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
‘या’ क्रिकेटपटूचं धोनीच्या भवितव्याबद्दल मोठं वक्तव्य! – https://t.co/lUypg0TLfq @msdhoni @SGanguly99
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019