… तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला गणवेश बदलावा लागला नसता- अनुराग कश्यप

मुंबई | देशात आणि राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे पुणे आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मास स्क्रिनिंग करण्यात येत आहे. यावरून चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यानं टीका केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे पुण्यानंतर मुंबईतही स्वयंसेवकांकडून मास स्क्रिनिंग करण्यात आलं हे टीकाकारांनी पाहावं, अशा आशयाचं ट्विट एका युझरनं केलं होतं. यावर अनुराग कश्यपनं पुन्हा ट्विट करत टीका केली आहे.

जर हीच पीपीई किट्स पोलीस, डॉक्टर्स आणि नर्सेसना दिली असती तर संघाला आपला गणवेश बदलण्याची गरज भासली नसती, असं म्हणत अनुरागने संघावर निशाणा साधलाय.

दरम्यान, जर तुम्हाला रिस्किंग लाईफ पाहायची असेल तर जे लोक अनवाणी रस्त्यांवर निघाले आहेत त्यांच्याकडे पाहा. प्रचाराची पण एक मर्यादा आहे, असं ट्विट अनुरागने केलंय.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-आफ्रिदी गेला खड्ड्यात, देशासाठी मी बंदूक उचलेन- हरभजन सिंग

-महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातील अमुल्य साहित्य ‘रत्न’ निखळलं; मुख्यमंत्र्यांची मतकरींना आदरांजली

-तज्ज्ञ अहवाल आता आवरा आणि इशाऱ्यांचे नगारे देणे थांबवा; संजय राऊत संतापले

-जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांना संजय राऊत यांचा सल्ला, म्हणाले…

-ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन