‘त्या रात्री फराह माझ्या रुममध्ये घुसली अन् मग… ‘; करण जोहरने सांगितलं मोठं सिक्रेट

मुंबई | बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शक फराह खानने आपल्या दिग्दर्शनाची सुरुवात ‘मे हू ना’ या चित्रपटापासून केली होती. त्यानंतर तिने काही चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे. फराह खानने निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा पहिला चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ मध्ये काजोलच्या मैत्रीणीची भूमिका साकारली आहे.

करण आणि फराहची मैत्री खूप जुनी आहे. त्या दोघांनी एकमेकांसोबत खूप चित्रपटात काम केलं आहे. ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाचे चित्रीकरण स्कॉटलँडमध्ये सुरु होतं. त्यावेळी फराह अचानाक एका रात्री करणच्या रुममध्ये घुसली आणि त्याच्या खोलीत भूत असल्याचे तिने सांगितलं.

फराहच्या या गोष्टीवर करणने भूतांसोबत कविता म्हणणारा मी कोण आहे का? मी तुला कोण मूर्ख वाटतो की मी तूझ्या बोलण्यात येईन?, असं उत्तर त्याने दिलं होतं.  करणने हे एका मुलाखतीत सांगितलं होतं. तसेच ही गोष्ट फराहने देखील एका मुलाखतीत कबूल केली होती.

फराह ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटादरम्यान करणच्या प्रेमात पडली असल्याचे म्हटलं जातं. याबाबतीत करणने साजिद खान आणि रितेश देशमुख यांच्या ‘यारो की बारात’ या चॅट शोमध्ये फराहाला मी आवडायचो आणि तिने मला लग्नासाठीही प्रपोझ केलं होतं, असं त्याने सांगितलं होतं.

परंतू फराह खानने 2004 साली शिरीष कुंदर यांच्याशी लग्न केले. विशेष म्हणजे फराह शिरीष पेक्षा 9 वर्षांपेक्षा मोठी आहे. आता फराह आणि शिरीष यांना तिळी मुलं आहेत. तर करण जोहरलाही टेस्ट ट्यूब बेबी मार्फत दोन जुळी मुलं झाली आहेत.

फराहने आपल्या मुलांची नावं अन्या, दिव्या आणि सिजार अशी ठेवली आहेत. तर करणने रुही आणि यश अशी नावं ठेवली आहेत. विशेष म्हणजे करण त्याच्या दोन्ही मुलांची काळजी सिंगल फादर म्हणून घेतो.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ अभिनेत्रीचा वॉचमन सोबत नाचतानाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ