535 भागांचा टप्पा पूर्ण करून ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

मुंबई | मराठी लोकांना चित्रपट, नाटक पाहायला खूप आवडतात. त्यातून विशेष म्हणजे रोज लागणाऱ्या सिरील पाहण्यात बायाकांना खूप सर असतो. काही महिलांना तर टाईम घरातील घड्याळ्यात न पाहता टिव्हीवर कोणती सिरीयल सुरू आहे, यावरून समजतो.

थोडक्यात टि्व्हीवरील सिरीयल या प्रत्येकाचा जीव की प्राण झाल्या आहेत. एवढच नव्हेतर एखाद्या सिरीयलमध्ये दुख:च वातावरण असेल तर सिरीयल पाहणाऱ्या घरामध्येही दुख:चं वातावरण असल्याचं फिल होतं. अशीच एक मालिका 2019 मध्ये ‘जीव झाला येडापिसा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली.

या मालिकेच्या टायटल सॉंग पासून ते या संपूर्ण मालिकेला प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारे शिवा आणि सिद्धी या दोघांना तर संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे वेगळं असून, त्यातील प्रत्येकाने लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.

जीव झाला येडापिसा  या मालिकेनं आतापर्यंत 535 भाग पूर्ण केले आहेत. मात्र अशातच प्रेक्षकांच्या मनाचा हिरमुडा करणारी माहिती समोर येत आहे.  ही मालिका 535 भागांचा टप्पा पूर्ण प्रेक्षकांचा निरोप घेँणार आहे.

यासंदर्भात अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून पोस्ट करून सांगितलं आहे. त्यात त्यानी लिहिले की, 535 भागांचा टप्पा पूर्ण करून जीव झाला येडापिसा या मालिकेचा प्रवास आज थांबतो आहे.

माझ्या काळजाच्या खूप जवळ असलेली ही मालिकी कोविड, पूराशी लढली. कले कलेनं वाढली. तसेच या मालिकेच्या पाच भाषांमध्ये आवृत्त्या निघाल्या आणि त्याही यशस्वी झाल्या. आज हा सगळा प्रवास थांबेल कधी थांबणार? यापेक्षा का थांबलातय़ हा प्रवास जास्त गोड वाटतो, असं चिन्मयने म्हटलं आहे.

त्याचबरोबर त्याने टीममधील सर्व जणांचे आभार मानले आहे. तसेच यासर्व मालिकेवर प्रेम करणाऱ्या रसिकांचे खूप आभार, असं चिन्मयने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

लाईव्ह कार्यक्रमातच गेस्टवर पडला टीव्ही स्टुडिओचा सेट, पुढे…

सकाळी दरवाजा उघडताच समोर दिसले दोन सिंह अन् मग…; पाहा…

लहान पण देगा देवा! ‘ती’ गोष्ट पहिल्यांदाच…

‘अत्यंत घाण भाषेत कलाकार सुद्धा…’, ‘हा’ अभिनेता…

इंजेक्शन घेताना आजीने दिली जबराट रिअॅक्शन, व्हिडीओ पाहून…