चंद्रपूर : माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तिघं गंभिर जखमी आहेत.
हंसराज अहिर हे अपघातातून बचावले आसून सुखरूप आहेत. हंसराज अहिर बसलेल्या गाडीच्या मागे ही गाडी होती. हंसराज अहिर चंद्रपूरहुन नागपूरला जात असताना वर्धा जिल्ह्यातील कांडळजवळ हा अपघात झाल्याचं समजतंय.
हंसराज अहिर यांचे वाहन पुढे गेल्यावर मागचे वाहन कंटेनरला धडकले आणि हा अपघात झाला. अपघात सीआरपीएफचा एक चालकही गंभीर जखमी झाला आहे.
जखमींना ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हंसराज अहिर स्वत: जखमींना रूग्नालयात घेऊन गेले.
महत्वाच्या बातम्या-
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार हा ‘सर्वोच्च नागरी पुरस्कार’, मोदी सरकारची घोषणा – https://t.co/O2JKXBOpIS @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 26, 2019
मिसेस मुख्यमंत्र्यांनी गायलं मनसेचं प्रचारगीत? ‘बाई आला गं मनसेचा सेनापती’; पहा व्हीडिओ – https://t.co/HpH9ZRv288 @RajThackeray @fadnavis_amruta @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 26, 2019
“पुण्यात पूरस्थिती असताना पालकमंत्री मात्र जागावाटपाच्या बैठकीसाठी दिल्लीत व्यस्त”- https://t.co/5Fsctfdkba #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 26, 2019