नाथाभाऊंनी मला मुलगा मानलं असतं तर ही वेळ आली नसती- गुलाबराव पाटील

जळगाव | नाथाभाऊंनी मला वडिलांसारखं प्रेम दिलं मात्र मुलगा कधी मानलं नाही, त्यामुळे ही वाईट वेळ आली, अशा कानपिचक्या शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंना लगावल्या आहेत.

एकनाथ खडसेंनी मुलगा म्हणून माझा वापर केला असता तर मी पक्का माणूस आहे. पिछे नही हटेगा, असं गुलाबराव पाटील म्हणाले. ते भुसावळमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

नाथाभाऊंनी अशा लोकांना सोबत ठेवलं त्यांचा रक्तग्रुप चेक केला नाही. जर त्यांनी रक्त ग्रुप चेक करून माणसं ठेवली असती तर गुलाबराव पाटील सारखा सच्चा माणूस कधी तुटला नसता, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राजकारणात कधीच कोणी कोणाचा दुश्मन नसतो. कधी वाटलं होतं का की तीन लोकांचं सरकार बनेल?, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला.

महत्वाच्या बातम्या- 

-देश आधी मनसे, अन् आता काँग्रेस करतंय अदनान सामीच्या ‘पद्मश्री’ला विरोध

-“शरद पवार अन् बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्रात हे दोनच विठ्ठल”

-“‘त्या’ आरटीआय कार्यकर्त्यांचे हातपाय तोडा”

-नाव घेतल्याने कोणी हिंदुहृदयसम्राट होत नाही; शिवसेनेची बोचरी टीका

-पुणेकरांनो शिवभोजनाचा आस्वाद घ्यायचाय; ‘या’ ठिकाणी मिळणार 10 रुपयांत थाळी