मुंबई | संकटाच्या काळात डॉक्टरांनी रूग्णालंय, क्लिनिक बंद करून असंवेदनशीलता दाखवू नये, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील खासगी डॉक्टरांना केलं आहे.
अनेक ठिकाणी अनेक रुग्णालयं भीतीपोटी बंद केलेत. हे अयोग्य आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर हे देवासमान असतात. डॉक्टरांनी आपली रूग्णालये सुरू ठेवावी, आपण अशा परिस्थितीत असंवेदनशीलता दाखवली तर सामान्य जनतेनं कोणाकडे जावं? असा सवाल टोपे यांनी केला.
कोणालाही त्रास होणार नाही. डॉक्टरांनी आपली रूग्णालये सुरू ठेवावी. कोरोना बाजूला ठेवावा. त्याव्यतिरिक्त आणखीही आजार आहेत. काही आपात्कालिन परिस्थितीत जर कोणाला काही मदत हवी असेल तर त्यांनी जावं कोणाकडे. त्यांनी आपली क्लिनिकही सुरू ठेवावी, असं राजेश टोपे म्हणाले.
दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 15 वर पोहोचल आहे. तर दुसरीकडे ज्यांना करोनाची लागण झाली होती त्यांचा आजार बराही झाला आहे. कोरोना बरा होतो हे लक्षात घेण्याची गरज आहे, असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं.
महत्वाच्या बातम्या –
-कोरोनाच्या लढाईसाठी क्रिकेटच्या देवानेही केली 50 लाख रूपयांची मदत
-अजित पवारांचं सैन्य दलाला पत्र; लोकांनो आता तर घराबाहेर पडूच नका…!
-फोन लावायचा होता आढळरावांना लागला अजितदादांना, ‘दादां’नी केलं झटक्यात काम!
-‘कोरोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे, अर्थव्यवस्थेवर याचा दीडवर्ष परिणाम होणार”
हीच ती वेळ, देवस्थानांनीही आपली दानपेटी समाजासाठी खुली करावी- रोहित पवार