राज्यात विमानसेवा सुरू होणार का?, गृहमंत्री अनिल देशमुख यांचं मोठं वक्तव्य

मुंबई  |  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आहे. केंद्र सरकारने 25 मेपासून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण राज्यात विमानसेवेवर मात्र बंदी कायमच आहे. मुंबईतील कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. अशावेळी रेड झोनमध्ये विमानसेवा सुरू करणं आणखी धोक्याच ठरेल. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

ग्रीन झोन मधील प्रवाशांना रेड झोन मध्ये आणून संसर्ग/ प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सावधगिरीने चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, त्यामुळे आपोआपच धोका ही वाढेलच! यामुळे राज्यात विमानसेवा अद्याप सुरू होणार नाही, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे.

रेड झोन मधील विमानतळ अशा परिस्थिती मध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे.स्वॅब शिवाय प्रवाशांचे नुसतं थर्मल स्कॅनिंग चा काय फायदा? सद्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही, असं ते म्हणाले.

पॉझिटिव्ह प्रवाशाला रेड झोन मध्ये आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे आहे. यामुळे पुढच्या काही काळात राज्यात विमानसेवा सुरू होणार नसल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-राज्यात 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचा विचार; शिक्षणमंत्र्यांचे संकेत

-लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले 19 हजार 100 कोटी रूपये…!

-कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोनमध्ये कडक बंधने पाळली गेली पाहिजेत; अजितदादांच्या प्रशासनाला सूचना

-निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही- रोहित पवार

-महाराष्ट्रातला मृत्यूदर गुजरात मध्य प्रदेशपेक्षा कमी, मात्र संसर्गाचा दर अधिक…