“‘शेरशाह’ चित्रपट करून चूक केली, असं मला वाटू लागलं आहे”

मुंबई | शहीद जवान विक्रम बत्रा यांच्या जिवनावर आधारित ‘शेरशाह’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. विक्रम बत्रा हे कारगिल युद्धावेळी नायक होते. विक्रम बत्रा यांनी कारगिल युद्धामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

एक धाडसी सैनिक म्हणून बत्रा यांची ओळख आहे. त्यांच्या जिवनात अनेक थरारक किस्से घडले होते. शेरशाह या चित्रपटात त्यांच्या जिवनातील अनेक किस्से दाखवण्यात आले आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. करण जोहर हा या चित्रपटाचा निर्माता आहे. या चित्रपटात अभिनेता साहिल वैद्य याने देखील काम केलं आहे.

मात्र, साहिलला आता हा चित्रपट करून आपण चूक केली असल्याचं वाटू लागलं आहे. याबद्दल साहिल उघडपणे बोलला आहे. त्याने यामागचं कारण सांगताना सिद्धार्थ मल्होत्राला टार्गेट केलं आहे.

साहिल म्हणाला की, सध्या सर्वत्र शेरशाह चित्रपटाचीच चर्चा चालू आहे. मात्र, या चित्रपटाचं सर्व श्रेय हे सिद्धार्थ मल्होत्रालाच दिलं जात आहे. हा चित्रपट पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वच कलाकारांनी खूप कष्ट घेतलं आहे. परंतु चर्चा फक्त सिध्दार्थची होत आहे.

तसेच साहिलला या चित्रपटात फौजीची भूमिका साकारायची होती. मात्र, दिग्दर्शकाने त्याला सनीची भूमिका दिली. धर्मा प्रोडक्शनने साहिलसाठी खूप काही केलं असल्याने तो त्यांना नकार देऊ शकला नाही, असं देखील साहिलने म्हटलं आहे.

सध्या शेरशाह चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र, साहिलच्या या नाराजीनंतर शेरशाहच्या टीममधील वाद चव्हाट्यावर आला आहे. आता यावर सिद्धार्थ काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या विक्रम बत्रा यांच्या जिवनावर आधारित असणाऱ्या शेरशाह चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. बत्रा यांच्या आयुष्यातील अनेक थरारक किस्से या चित्रपटात पाहायला मिळत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

अरे बापरे! सलमान चक्क घोड्यासोबत खातोय चारा, व्हिडीओ व्हायरल

विद्युत जामवालच्या डेटिंगची सर्वत्र चर्चा, करिश्मासोबत आहे खास कनेक्शन

…म्हणून माधुरी आणि भारती चालू कार्यक्रमात ढसाढसा रडल्या, पाहा व्हिडीओ

तालिबान्यांशी हिंदुत्वाची तुलना करणं स्वरा भास्करला महागात पडलं, FIR दाखल?

कंडोममध्ये सोनं घालून महिलांनी अशा जागी लपवलं की पाहून मुंबई पोलीसही चक्रावले!