मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सर्वोच्च न्यायालयानं सुशांत राजपूत प्रकरण सीबीआयच्या हाती दिलं असून सीबीआय याप्रकरणी अतिशय वेगानं तपास करत आहे. सुशांत प्रकरणी सीबीआय टीम सुशांतशी निगडीत अनेक लोकांची चौकशी करत आहे. अशातच आता सीबीआय अधिकाऱ्यांनी सुशांत प्रकरणी मोठा खुलासा केला आहे.
सीबीआय अधिकाऱ्यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. यावेळी सुशांतची ह.त्या झाल्याचा एकही पुरावा आम्हाला अद्याप मिळाला नाही, असा खुलासा सीबीआय अधिकाऱ्यांनी केला आहे. सुशांत प्रकरणाशी जोडलेला प्रत्येक धागा दोरा शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असंही सीबीआय टीमनं यावेळी सांगितलं आहे.
सुशांतचे फोरेन्सिक रिपोर्ट सुशांत प्रकरणी अनेकांचे घेतलेले जबाब, सुशांत प्रकरणाचा क्राइम सीन रिक्रीएशन इत्यादी सर्व बाबी लक्षात घेता अद्याप सुशांतच्या ह.त्येकडे बोट दाखवलं जावू शकतं असा कोणताही पुरावा मिळाला नाही, असं सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
सुशांत प्रकरणाचा तपास अद्याप देखील सुरु आहे. सुशांत प्रकरणाचा दोन्ही बाजूंनी तपास सुरु आहे. सुशांतने आत्महत्या केली असावी या बाजूनेही सुशांत प्रकरणी तपास केला जाणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे.
गेल्या पाच दिवसापासून सीबीआय टीम रियाची चौकशी करत आहे. अशातच आता रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनं सुशांतच घर सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे. सुशांतची बहिण प्रियंका हिने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय सुशांतला औषधं घेण्यास सांगितलं होतं. रियानं सुशांतला ती औषधं घेण्यास विरोध केल्यानं रिया आणि सुशांतमध्ये वाद होवून रियानं घर सोडल्याचं माने शिंदे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, सुशांत प्रकरणी सुरुवातीपासून रियावर सातत्याने आरोप केला जात आहे की रिया सुशांतला कंट्रोल करत होती. मात्र सुशांतला त्याच्या बहिणी पूर्णपणे कंट्रोल करत होत्या, असा आरोपही माने शिंदे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेला मोठा धक्का! तब्बल ‘इतक्या’ शिवसैनिकांनी मनसेचा झेंडा हाती घेतला
‘या’ कारणासाठी रियानं सोडलं होतं सुशांतचं घर; रियाच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा!
सीबीआय समोर अखेर रियानं उलघडलं महेश भट्ट आणि तिच्या नात्याविषयीचं गूढ
“इतर स्टार्सप्रमाणे तुझंही करिअर संपवून टाकेन अशी धमकी सुशांतला दिली होती”
दारूप्रमाणे मंदिरातून महसुल मिळाला असता तर…; भाजपची ठाकरे सरकारवर गंभीर टीका