…तर मनसेचा राज्यात एकही आमदार दिसणार नाही- इम्तियाज जलील

औरंगाबाद | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी औरंगाबादचे नामकरण  संभाजीनगर करण्यात यावं अशी मागणी केली होती. मनसेच्या याच मागणीवरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.

दिल्लीत केजरीवालांनी एनआरसी, सीएए आणि हिंदू मुसलमान या मुद्यांवर निवडणुक लढली नाही. त्यांनी वीज, पाणी, आणि आरोग्य अशा विकासाच्या प्रश्नांवर दिल्लीची तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. त्यामुळे मनसेने यातून धडा घ्यावा. नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत मनसेचा एकही आमदार दिसणार नसल्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

मनसे आणि शिवसेना केवळ जातीपातीचे राजकारण करतात. दिल्ली विधानसभेचा निकाल त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजण घालणारं असल्याचंही जलील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, इम्तियाज जलील यांच्या या टीकेला मनसे काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-“माझ्या समाजासाठी शरद पवारच मोठा आधार”

-‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी सांगितला पहिल्या प्रेमाचा किस्सा!

-केजरीवालांची लेक भाजपवर तुफान बरसली; म्हणाली…

-शिवजयंतीपासून कॉलेजमध्ये घुमणार ‘जन-गण-मन’चा सूर; ठाकरे सरकारचा निर्णय

-अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ; ठाकरे सरकारची मोठी घोषणा!