सचिन वाझे प्रकरणात किरट सोमय्यांनी ठाकरे सरकारला दिला ‘हा’ सल्ला, म्हणाले…

मुंबई | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फो.टके सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौ.कशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अ.टक करण्यात आली. यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये चांगलीच आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली आहे.

मनसुख हिरेन मृ.त्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका सं.शयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या र.डारवर होते. त्यांच्या अ.टकेनंतर भाजप नेते जास्तच आक्रमक झाले असल्याचं दिसतं आहे.

सचिन वाझे प्रकरणाचा तपास NIA आणि ATS करत आहेत. अशातच सचिन वाझे प्रकरणासंबंधी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला सल्ला दिला आहे.

सचिन वाझे, मनसुख हिरेन आणि मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी ह.ल्लाची आणखी हे सर्व मुद्दे एकमेकांशी जोडले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारने NIA ला तपास करण्यात सहकार्य करावं, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी सरकारने या प्रकरणात ठाकरे सरकारने चालढकल थांबवावी, असंही सोमय्या म्हणाले आहेत.

या प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या आकाऊंटवरुन ट्विट करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती.

तसेच, मिडीया रिपोर्टनूसार सचिन वाझे यांनी मुकेश आंबानी यांच्याकडून शिवसेनेला पैसे काढायचे होते, असं स्पष्ट केलं होत. म्हणजेच शिवसेना या क्राईममध्ये एक पार्टी आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. तिथे संपूर्ण सत्य काय आहे हे बाहेर पडणार नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी देखील निलेश राणे यांनी केली होती.

दरम्यान,  सचिन वाझे प्रकरणात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकरावर आणखी एक आ.रोप केला आहे. सचिन वाझे, परमबीर सिंह ही छोटी माणसे आहेत. त्यांच्या मागचे हात शोधा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-