गेल्यावर्षाभरापासून एकीकडे कोरोना रोगाने थैमान घातलं आहे. तर दुसरीकडे बदलत्या हवामानाने नको-नकोस केलं आहे. अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे त्याचबरोबर अनेक पीकांचे नुकसान होतं.
आताकुठे कडाडीचा उन्हाळा जाणवायला लागला असताना, अशातच पुन्हा पाऊस डोकं वर काढायला सुरुवात करत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात तापनात मोठा बदल घडल्यामुळे काही भागात पुढील काही दिवसामध्ये हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.
गेल्या दोन दिवसांपासून तौत्के चक्रीवादळाने सगळीकडे थैमान घातलं आहे. जरी हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकलं असलं, तरी त्याचा परिणाम मुंबई किनारपट्टीवर अजूनही असल्याची माहिती समोर आली आहे.
चक्रीवादळाचे हे संकट अद्यापही संपलेलं नाही. पुढील काही तासांत मुंबईसह उपनगरा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील काही तासांत पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या पाऊसाचा वेग 80 ते 90 किलोमीटर प्रतितास वेगाने वाढण्याची शक्यताही वर्तवली आहे.
तसेच या अशा परिस्थितीत मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये. जर काही अत्यावश्यक किंवा इमर्जन्सी असेल, तरच घराबाहेर पडावे. तसेच घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहनही हवामान खात्याने नागरिकांना केलं आहे.
सोमवार 17 मे रोजी रात्रभर मुंबईत पाऊसाने हजेरी लावली होती. पाऊसासोबत वारंही असल्यामुळे अनेक झाडं कोसळली. त्यामुळे काही ठिकाणचा विजपुरठा खंडीत झाला आहे.
दरम्यान, या अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक भाज्या, फळांचे नुकसान झालं आहे. त्याचप्रमाणे लागवड केलेली पीकांचेही नुकसान झालं असल्याचं समजतं आहे. या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसला आहे.
महत्वाच्या बातम्या-
भयानक चक्रीवादळातही ‘ती’ महिला पावसात भिजत मारत…
घरात जागा नाही म्हणून ‘तो’ चक्क 11 दिवस झाडावर…
लग्नातील वऱ्हाड्यांची तुफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ
कुत्र्याला लाथ मारायच्या नादात रिक्षाचालकाचा तोल सुटला…
तलावावर पाणी प्यायला आलेल्यावर मगरीने केला हल्ला अन्…,…