“2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष करायचाय”

सांगली | 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष करायचा आहे. जे येतील त्यांना येऊ द्या. त्यावर आक्षेप घेऊ नका, कारण संख्यात्मक महत्व असतं, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केली आहे.

देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदी आणि भाजपवर निशाणा साधलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहजासहजी माघार घेणारे नाहीत. त्यांनी माफी मागितली म्हणजे त्यांचा होमवर्क झाला होता. ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीने परत कायदे आणणार. त्यामुळे 2024 मध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी कंबर कसली पाहिजे, असंही ते म्हणालेत.

मनाचा भेद करुन भाजपने लोकांच्या मनावर कब्जा मिळवला आहे. भाजप म्हणून नाही तर मोदी म्हणून 2014 ला भाजपला मतं मिळाली, असं जयंत पाटलांनी सांगितलं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जर गाव-खेड्यात काम करत असेल तर आपणही तसंच काम केलं पाहिजे, असं आवाहन जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

24 तास कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. पक्षाचं संघटन वाढवलं पाहिजे. पक्ष संघटनेनं तुम्हाला मान्यता दिली पाहिजे. केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग होत असताना महाराष्ट्र पवार साहेबांच्या पाठिशी उभा राहिला, असं ते म्हणाले.

शरद पवार यांचा उरलेला विदर्भ दौरा लवकरच होणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना दिली आहे.

दरम्यान, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत क्रिप्टोकरन्सीसह आणखी अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. सरकारने कृषीविषयक तीन कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी जाहीर केलं आहे.

किमान आधारभूत किमतीच्या हमीबाबत शेतकरी अजूनही ठाम आहेत आणि आंदोलन मागे घेतलेलं नाही. जोपर्यंत कायदे राज्यासभेत मागे घेतले जाणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच राहील, असं शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या  – 

देवेंद्र फडणवीसांना पाहून काँग्रेसच्या आमदारानं काढला पळ, मोठं कारण आलं समोर 

अण्णा हजारेंनी घेतला अजित पवारांचा धसका?, ‘या’ निर्णयाची रंगलीय खमंग चर्चा

‘हे तर तीन तिघाडा काम बिघाडा सरकार’; पंकजा मुंडेंचा घणाघात 

  नवाब मलिकांचा गौप्यस्फोट; क्रांती रेडकरचे ‘ते’ कथित चॅट केले शेअर

  “एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये येऊन आयुष्य सुखकर करावं”