बीड : आमच्या काकांनी 50 कोटी देऊन मंत्रीपद घेतलं, असा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर यांच्यावर त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा बीडमध्ये होती. यावेळी भरसभेत संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागरांवर आरोप केला.
एवढे पैसे जर विकास कामांसाठी लावले असते तर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलला असता. असंही संदीप क्षीरसागर म्हणाले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेही उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वीच जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळालं. यावरुनच या काका-पुतण्याचा वाद शिगेला पोहचल्याचं दिसतंय.
आण्णा काही दिवसांपूर्वी सांगत होता हातातून घड्याळ काढून धनुष्य हातात घ्या. पण आता तुमचं वय 75 झालं आहे. या वयात धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला तर बरगड्या फुटतील, असंही संदीप क्षीरसागर म्हणाले आहेत.
दरम्यान, तुम्ही आम्हाला वानरसेना म्हणून हिणवता. पण तुमच्यासारख्या गर्विष्ठ रावणाची लंका हीच ‘वानरसेना’ जाळल्याशिवाय राहणार नाही, असंही संदीप क्षीरसागर यांनी सुनावलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
मनसेची पोस्टरबाजी; देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे आरोपीच्या पिंजऱ्यात! – https://t.co/0J9ODKd2pT @mnsadhikrut @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @Pankajamunde
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 26, 2019
बहुजन आघाडीच्या 2 आमदार शिवसेनेत; हितेश ठाकूर म्हणतात “देव त्यांचं भलं करो” – https://t.co/DboA3RnjZp @ShivSena @Hitesh_Thakur
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 26, 2019
“‘तो’ निर्णय सरकारने दडपशाहीने घेतला आहे” – https://t.co/6dfB41IywL @KolsePatilBG @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 26, 2019