पवार साहेब… ‘या’ नेत्याने पद्धतशीरपणे राष्ट्रवादीचं वाटोळं केलंय- जितेंद्र आव्हाड

मुंबई |  राष्ट्रवादीचे नवी मुंबईतले तगडे नेते गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र आमदार संदीप नाईक यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपात जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

गणेश नाईक यांनी पद्धतशीरपणे राष्ट्रवादीचं वाटोळं केलंय. कल्याण, मीरा-भाईंदर आणि भिवंडीत त्यांनी पक्ष संपवलाय, अशी जोरदार टीका आव्हाडांनी केली आहे.

पवार साहेबांनी आणि राष्ट्रवादीने नाईकांना अनेक संधी दिल्या. फक्त त्यांनाच संधी न देता त्यांच्या कुटुंबियांना देखील संधी दिल्या. मात्र त्यांनी पक्षाक्षी गद्दारी केली, असं आव्हाड म्हणाले.

त्यांना 2014 साली पक्ष सोडायचा होता. हे मी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना कळवलं होतं. त्यांची त्याच वेळी पक्षाने हकालपट्टी करायला पाहिजे होती. पण पक्षाने माझं ऐकलं नाही. अखेर त्यांचा लबाड चेहरा समोर आला आहे, अशा शब्दात त्यांनी नाईकांना लक्ष्य केलं आहे.

गणेश नाईक भाजपात जाण्याच्या अगोदर भाजप आमदार मंदा म्हात्रे त्यांना शिव्या घालत आहेत. अन् ते स्वाभिमानाच्या गोष्टी करतात. त्यांच्या भाजपात जाण्याने आम्हाला कसलाही फरक पडणार नाही. राष्ट्रवादी खंबीरपणे उभी राहिल, अशी आक्रमक प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली आहे.

दरम्यान, गणेश नाईक आपले पुत्र संदीप नाईक आणि नवी मुंबई महानगरपालिकेतले 57 नगरसेवकांना घेऊन भाजपात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शोलेचा डायलॉग बदलून आता म्हणावं लागतंय ‘जो डर गया वो भाजप में गया’!

-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साताऱ्याच्या गडानंतर सोलापूरचा बुरूज ढासळणार??

-अन् मुस्लिम महिलांना न्याय देणारं ‘तीन तलाक’ विधेयक राज्यसभेत मंजूर!

-छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार??? उद्धव ठाकरे म्हणतात…

-इस्रोच्या एकावर एक यशस्वी मोहिमा अन् केंद्र सरकार करतंय शास्त्रज्ञांच्या पगारात कपात!