“साहेबांनी ज्यांना पुत्रवत प्रेम दिलं ते कधीच गद्दारी करणार नाहीत”

मुंबई |  राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई शहराचे अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर अहिर यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

ज्यांच्यावर साहेबांनी आणि पक्षाने पुत्रवत प्रेम केलं… ज्यांना मुलासारखी माया दिली… ते कधीच पक्षाशी गद्दारी करणार नाहीत, असं मत आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे सचिन अहिर शिवसेनेत जाणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला आहे. पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही दिलंय. एकनिष्ठ नेते कधीच गद्दारी करणार नाहीत, असं आव्हाड म्हणाले आहेत.

बुधवारी रात्रीपासून सचिन अहिर राष्ट्रवादीला रामराम ठोकत सेनेचं शिवबंधन हातात बांधणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अहिरांनी जर शिवसेनेत प्रवेश केला तर राष्ट्रवादीसाठी तो खूप मोठा धक्का मानण्यात येत आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे आमदार भाजप-सेनेच्या संपर्कात आहेत, असा दावा सेना-भाजपचे नेते अनेकदा करत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापले नेते सांभाळणे हे मोठं आव्हान असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीला गळती; ‘हा’ आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश???

-लक्ष्मण मानेंचा ‘वंचित’ला दे धक्का; ‘महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी’ची घोषणा

-आजारपणातून बरं होताच अकबरुद्दीन ओवैसींकडून ‘15 मिनिट’वाल्या वक्तव्याचा पुनरुच्चार

-फडणवीसांची महाजनादेश यात्रा; उद्घाटनाला शहा तर समारोपाला मोदी

-विराट कोहलीला इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी मिळणारी किंमत ऐकून थक्क व्हाल!