मुंबई| गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत. राजकीय महत्वाकांक्षेपोटी त्यांनी मुलाला भाजपमध्ये पाठवून त्याचा बळी दिल्याची जहरी टीका गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.
मुंबईतील कारखाने, दगडखाणींकडून ते खंडणी वसूल करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी बोलताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मुंबईत गणेश नाईकांकडून सर्वात मोठी खंडणी वसूल केली जात आहे. येथील कारखाने, दगडखाणींमधून खंडणी वसूल करणाऱ्या नाईकांची सल्तनत नेस्तनाबूद करण्याचं आवाहन आव्हाड यांनी केलं.
मुंबई महानगरपालिका निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वातावरण निर्मितीसाठी आमदार रोहित पवार यांची बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोपरखैरणे येथे झालेल्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी माजी मंत्री गणेश नाईक यांचा समाचार घेतला.
काही लोकांचे नशीब आहे, ते शिवसेनेकडे गेले आणि त्यानंतर पवारांकडे आले. ते स्वतःचे खिशे भरण्यासाठी लढले. whad यांना नाराज केले. गणेश नाईकमुळे ते पक्ष सोडून गेले. गणेश नाईकमुळे विजय चौघुले यांचे देखील तिकीट कापले, असं आव्हाड म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-आम्ही 100 असलो तरी त्यांना पुरून उरतोय- सुप्रिया सुळे
-“जर एखादी जादू झाली आणि संघ परिवारातील सर्व स्वयंसेवक गायब झाले, तर…”
-आता नोटा तर सोडाच पण बॅंका बंद व्हायची भीती वाटतीय- संजय राऊत
-तुम्ही देखील घायाळ व्हाल दीपिकाचा बीचवरील हॉट अंदाज पाहून
-“डॉ आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे, असं मी म्हणालोच नाही”