मुंबई | सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चक्क सोशल मीडियालाच रामराम करण्याचा विचार करत आहेत. त्यांनी स्वत:च यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. मोदींच्या या ट्वीटनंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजप नेत्यांनी काहीशा सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर विरोधी पक्षांनी मात्र मोदींच्या निर्णयावर काडाडून प्रहार केले आहेत. त्यांच्या ट्वीटनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांना सल्ला देणारं खोचक ट्वीट केलं आहे.
पंतप्रधान मोदीजी आपण सोशल मीडिया सोडू नका तर द्वेष सोडा, असा सल्ला त्यांनी मोदींना दिला आहे. त्यांचा हा सल्ला कर्नाटक भाजपला भलताच झोंबलाय. ट्वीट करून त्यांनी थेट राहुल गांधी आणि सोनिया गांधींना लक्ष्य केलं आहे.
प्रिय राहुल गांधी, भारतात आता राजीव फिरोज गांधी किंवा एडविग एंटोनिया अलबिना मायनो (सोनिया गांधी) यांचे सरकार नाहीए. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आहे. आपेक्षा आहे वास्तवाचे तुम्हाला भान येईल, असं ट्वीट करत कर्नाटक भाजपने थेट राहुल गांधींवर हल्ला चढवलाय.
दुसरीकडे काही भाजप नेत्यांनी मोदींनी जर सोशल मीडिया सोडला तर आपण देखील सोशल मीडिया सोडू, असा पवित्रा घेतला आहे.
मोदींनी सोशल मीडिया सोडण्यासंबंधी काय केलं होतं ट्वीट-
येत्या रविवारपासून मी माझी सोशल मीडिया अकाऊंट बंद करण्याचा विचार करतोय. यामध्ये माझ्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबचा समावेश असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
This Sunday, thinking of giving up my social media accounts on Facebook, Twitter, Instagram & YouTube. Will keep you all posted.
— Narendra Modi (@narendramodi) March 2, 2020
महत्त्वाच्या बातम्या-
-“जीडीपी घसरायला लागला की लागले टीआरपी स्टंट करायला”
-मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या विचारावर राहुल गांधींचा खोचक टोला
-हा भाजप नेता म्हणतो, मोदींनी सोशल मीडिया सोडलं तर मी देखील सोडेन!
-पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सोशल मीडियाला गुडबाय? मोदींची ट्वीट करून माहिती
-ठाकरे बंधुंच्या नातेवाईकांकडूनच नाणारमधील जमिनींची खरेदी; भाजपच्या माजी आमदाराचा दावा