काँग्रेसचे कपिल सिब्बल म्हणतात CAA सर्व राज्यात लागू केलचं पाहिजे

नवी दिल्ली | नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत मंजूर करण्यात आल्याने हा कायदा सर्व राज्यांना लागू करणं बंधनकारक आहे. कोणतंही राज्य हा कायदा लागू करणार नाही, असं बोलू शकत नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

कपिल सिब्बल यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेससह विरोधक बॅकफुटवर जाण्याची शक्यता आहे. केरळ लिटरेचर फेस्टिव्हल कार्यक्रमात बोलताना कपिल सिब्बल यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा हा संसदेत मंजूर करण्यात आला आहे. संसदेत मंजूर करण्यात आलेला कायदा लागू करणं देशातील सर्व राज्यांना बंधनकारक असतं. कोणतंही राज्य त्याची अंमलबजावणी करणार नाही असं म्हणू शकत नाही, असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभर आंदोलन पुकारण्यात येत आहे. तसेच काँग्रेससह विविध पक्षांनी याला विरोध करणं सुरूच ठेवलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-“गांधी कुटुंबातील एका सदस्याला पंतप्रधान करायचे होते म्हणूनच देशाची फाळणी झाली”

-“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि येडीयुरप्पा तुम्ही एकत्र बसा आणि हा प्रश्न कायमचा सोडवून टाका”

-पप्पा तुम्ही लवकर परत या…; चौथीत शिकणाऱ्या मंगेशचा हृदयद्रावक निबंध व्हायरल

-“कलम 370 हटवून काश्मीरप्रश्न संपवला… मग सीमाप्रश्न सोडवायला काय अडचण आहे??”

-…पण आपण केवळ शिवरायांच्या पुतळ्याच्या उंचीवरून भांडत आहोत याची खंत वाटते- बाबासाहेब पुरंदरे