‘दोस्ताना 2’ नंतर आणखी एका चित्रपटातून कार्तिक आर्यन बाहेर…

मुंबई| अभिनेता कार्तिक आर्यन आज बी-टाऊनमधले एक मोठे नाव बनले आहे आणि त्याने एकामागून एक अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले आहे. कार्तिक नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असलेला पहायला मिळत असतो. मात्र सध्या तो एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आला आहे.

करण जोहर आणि धर्मा प्रॉडक्शनशी झालेल्या विवादानंतर नुकताच तो पुन्हा एकदा चर्चेत आला होता. या विवादानंतर कार्तिकला ‘दोस्ताना 2’ या चित्रपटातून बाहेर जाव लागलं होतं.  यातच आता आणखी एका चित्रपटातून कार्तिकने काढता पाय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

वसन बाला दिग्दर्शित ‘फँटम’ चित्रपट असून हा एक सायन्स फिक्शन असलेला चित्रपट असणार आहे. या चित्रपटासाठी कार्तिकची निवड करण्यात आली होती. परंतु, आता मात्र कार्तिकने चित्रपटातून माघार घेतली आहे.

हा चित्रपट एका कॉमिकच्या सुपरहिरोवर आधारित आहे. बाला यांना ज्या प्रकारचा चित्रपट बनवायचा होता. ती योजना कार्तिकला पटली नाही. कार्तिकला हा सुपरहिरो चित्रपट असल्याने तो वेगळ्या थाटनीचा तसंच बिग बजेट असायला हवा होता. पण बाला यांच्याशी त्याचं मत पटत नव्हतं. क्रिएटिव्ह सोबत असलेल्या या मतभेदामुळे कार्तिकने या चित्रपटाला नकार दिला.

कार्तिक याच प्रोडक्शनसोबत दुसरा चित्रपट साइन करणार आहे. कार्तिकने या चित्रपटाबद्दलची घोषणा केल्यावर त्याचे चाहते प्रचंड आनंदित झाले होते. त्यामुळे आता या नव्या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

कार्तिक आर्यन लवकरच ‘धमाका’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो एक पत्रकाराची भूमिका साकारताना पहायला मिळणार आहे.

दरम्यान, ‘दोस्ताना 2’ या फिल्ममधून अभिनेता कार्तिक आर्यनला बाहेर केल्यानं करण जोहरवर पुन्हा एकदा प्रेक्षक संतापलेले आहेत. सोशल मीडियावर करण जोहरला नेटिझन्सनी लक्ष्य केलं आहे. त्याच्यावर निशाणा साधला आहे.

करणने कार्तिक आर्यनला आगामी सिनेमा ‘दोस्ताना 2’ मधून डच्चू दिला आहे. यावरच करण थांबला नाही तर यापुढेही धर्मा प्रॉडक्शन आणि त्याद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमात कार्तिकला सहभागी न करण्याची शथपही घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

‘मला आणि माझ्या कुटूंबाला भाजपकडून जीवे मारण्याच्या…

IPl 2021: पृथ्वी शाॅच्या झंझावती खेळीमुळे दिल्लीचा कोलकातावर…

इरफान खानला झाला होता मृत्यूचा आभास; शेवटचा श्वास घेत…

सावधान! कोरोनाची लक्षणं असतानाही ‘या’ कारणांमुळे…

कोरोना काळात आहाराबाबत घ्या ‘ही’ काळजी