मुंबई | राज्यातील विविध भागात लॉकडाउनमुळं अडकून पडलेल्या लोकांना त्यांच्या जिल्ह्यातल्या गावी पोहोचवण्यासाठी 10 हजार एसटी बस सोडण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे हा एसटीचा प्रवास मोफत दिला जाणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टिवार यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात अडकलेल्या लोकांना आपापल्या जिल्ह्यातील गावी पोहोचवण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून एसटी महामंडळाला निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. पुढच्या दोन-तीन दिवसांत या माध्यमातून जवळपास 10 हजार बसेस सोडून या अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं वडेट्टिवार यांनी सांगितलं आहे.
संबंधित जिल्हा प्रशासनाची माहिती, स्क्रिनिंगचं काम, गरज पडल्यास कोरोनाची लक्षणं आढळून आलेल्यांना संस्थात्मक क्वारंटाइन करणं, या बाबींची चर्चाही झाली आहे, अशी माहिती वडेट्टिवार यांनी दिली आहे.
दरम्यान, लोकांना तिकीटाचा कुठलाही भुर्दंड पडणार नाही, अशी भुमिका घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाला केल्या आहेत, अशी माहितीही वडेट्टिवार यांनी दिली.
राज्यातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी शासनाकडून १० हजार एसटी बसेसमार्फत मोफत सेवा देण्याचा निर्णय. याबाबत सांगताहेत मदत व पुनर्वसन मंत्री @VijayWadettiwar pic.twitter.com/d2OnK7Xce2
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 6, 2020
महत्वाच्या बातम्या-
-’17 मेनंतर काय करणार?’; सोनिया गांधींचा केंद्र सरकारला सवाल
-…म्हणून चंद्रकांत पाटलांचा लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीला विरोध
-धक्कादायक! एका दिवसात 38 पोलिसांना कोरोनाची लागण
-आणखी बळी जातील पण अर्थव्यवस्थेला चालना देणं महत्वाचं- डोनाल्ड ट्रम्प
-महाराष्ट्रातली परिस्थिती चिंतेची, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार- केंद्रिय आरोग्यमंत्री